Summary of the Book
"....परराष्ट्र धोरणाबद्दल बोलायचे तर ते धोरण म्हणजे
बुद्धिबळाच्या पटावरील खेळ नसतो. अखेरीस परराष्ट्र
धोरण हे आर्थिक धोरणाची परिणती असते. तेव्हा आपले
आर्थिक धोरण निश्चित केल्याशिवाय आपल्या परराष्ट्र
धोरणास स्पष्टता व आकार येणार नाही. आपण शांतता,
सदिच्छा, स्वातंत्र्य याचे पाठीराखे आहोत असे जाहीर केले
तरी आर्थिक धोरणाच्या अभावी ते अर्थशून्य होईल.
कारण सर्वच देश या प्रकारची ग्वाही देत असतात.
आपण कोणतेही धोरण ठरवले तरी परराष्ट्र धोरण आमलात
आणायचे तर आपल्या देशाचे हित कशामुळे साधणार आहे
हे ठरवणे आवश्यक असते. अखेरीस देशाचे हित
साधण्यासाठीच सरकारने कारभार करायचा असतो.
नजीकच्या तसेच दूरच्या काळात देशहिताचे जे असेल
त्याच्या विरुद्ध जाऊन कोणत्याच सरकारला टिकाव धरता
येणार नाही."
- पंडित जवाहरलाल नेहरू