Summary of the Book
सुमारे चाळीस वर्षे अशोक चोप्रा यांना भारतातील काही दिग्गजांचे लेखन प्रकाशित करणारे एक 'विश्वासार्ह' नाव अशा अर्थाने ओळखले जाते : खुशवंत सिंग, शोभा डे, डॅाम मोराएस, डॉमनिक लापिएर आणि लॅरी कॉलिन्स, ही त्यांच्या नामांकित सूचीमधील काही प्रमुख नावे आहेत. सदर पुस्तकात अशोक चोप्रा यांनी त्या सगळ्यांच्या प्रांजळ आणि इंद्रधनुषी रंगांतील अनुभवांवर आधारित त्यांची जीवनचरित्र रंगवताना, प्रकाशन व्यवसायातील स्वतःच्या प्रदीर्घ कार्यकालात आपण कसे काम केले आणि कशा प्रकारची काम भारतीय प्रकाशन व्यवसायाच्या बाजारात करावी लागतात; यासंबंधीचा आढावा घेतला आहे. त्यातील काही मुद्दे : काही पुस्तके ही कां टिकतात आणि इतर कां नाहीत ? प्रकाशक आणि लेखक यांच्यासाठी काही खास यशाचे सूत्र आहे का ? भारतीय वाचकांना काय अपेक्षित आहे ? पाठ्यपुस्तकं आणि संदर्भ-मार्गदर्शिका यांच्यातील दलाली काय असते ? तसेच पुस्तकावरील बंदी आणि सेन्सॉरशिप यांवर काय करता येऊ शकतं ? आणि आजच्या घडीला ई-पुस्तकं आणि डिजिटल वाचक यांच्यावर पुस्तक विक्री बाजाराची एकूण पकड कशी आहे ?
या सगळ्याचा आढावा घेताना, अशोक चोप्रा यांनी प्रकाशन व्यवसायातील व्यावसायिक पैलू समजावून सांगितला तर आहेच, शिवाय त्यातील मानवीय स्वभावाचे चित्रण करायला ते विसरलेले नाहीत. मग त्यात हस्तलिखित मिळवण्याचे स्त्रोत, दिलीप कुमार, अनुपम खेर यांच्यासारख्या ख्यातनाम लेखकांना मिळवण्याची आव्हानं, प्रकाशन जगतातील जीवघेणे ऐतिहासिक सौदे किंवा स्वार्थी वृत्ती, मनमानी आणि पोकळ बाता सगळ्या गोष्टींसह अशोक चोप्रा यांचा हा प्रवास दिव्य तसेच हुकूमी वाटावा, असा निश्चितच आहे. एखादे पुस्तक विक्रमी होण्यासाठी सोहळा आयोजित करायचा असेल, ( उदाहरणादाखल Freedom at Midnight चे नियंत्रित न करता येणारे यश ) तेव्हा तो दिमाखात करायला ते विसरत नाहीत. ( जसे, 'शालिमार' हे पुस्तक एका चित्रपटावर आधारित होते. पण ते भारतीय प्रकाशन व्यवसायातील विक्रीच्या दृष्टीने सर्वात मोठे असफल ठरलेले पुस्तक होते ) ह्या सगळ्या प्रवासाबरोबर ते पुस्तक जगातील लज्जास्पद वाटणाऱ्या मालिका, असंस्कृत मेजवनींच्या कहाण्या, युद्धनौका आणि बोटीवरील वाजवीपेक्षा अधिक दिखाऊ असे पुस्तकांचे कार्यक्रम; या साऱ्या गोष्टींविषयी इत्थंभूत माहितीसुद्धा देतात.