Hard Copy Price:
25% OFF R 130R 97
/ $
1.24
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
अचानक एखाद्या ट्रेनच्या डब्ब्यातील गर्दीत मिसळून ती जिकडे घेऊन जाईल तिकडे जावं. खिडकीतून दिसणाऱ्या सौंदर्यात भिरकावून द्यावा आपला भूत आणि भविष्य... अचानक उतरावं, कुठल्या तरी आडरानातील स्टेशनात जिथं आपण निरक्षर असू, आणि चालत निघावं, दूर क्षितीजापलीकडील दिसणाऱ्या गावाकडे. एखाद्या शेतकऱ्याला करावी मदत, दोन भाकरी पुरती. आणि निघून जावं पुढ जगाचा शोध घेत.
नवीन देश, नवीन संस्कृत्या पादाक्रांत करत. संस्कृती खेड्यांची असते, आदिवासी पाड्यांची, रानांची असते, जंगलांची असते. ह्या कोणत्याही संस्कृत्यांचा भाग न बनता आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून फक्त चालत राहवं. तुला सावकाश कळेल की आपले पाय स्वतःचा भार सोसू शकतात आणि जमिनीशी स्पर्शाचे नाते निर्माण करू शकतात. अंगावरच्या पूर्ण कपड्यात तुला मज्जा वाटणार नाही. तुला समजेल, शरीराला खूप कमी अन्न लागतं. किंबहुना शरीराला लागणारी हवा, पाणी आणि अन्न हे खूप उपलब्ध आहे, त्यासाठी आयुष्य वाया घालवण्याची गरज नाही.
अथक चालल्यानंतर तुझ्या शरीरावर गरज नसताना चढलेली चरबी गायब झालेली असेल, मनावर चढलेले भीतीचे मळभ नष्ट झालेले असतील. सर्व सोडून मिळवलेले हे स्वातंत्र्यच खरे, बाकी सगळी माया, हे तुझ्या लक्षात येईल. तुला का हे माहीत नसताना मिळालेल्या जीवनाचा प्रवास तू आनंदाने करू शकशील. गरज आहे फक्त एकदा बाहेर पडण्याची.
भंपकपणे लिहिलेल्या रटाळ कथांच पुस्तक आहे. चावण्यात अपला वेळ घालवू नका.
Snigdha Kulkarni
12 Dec 2016 05 30 AM
खूप दिवसांनी मराठी मधे काहीतरी रसभरीत वाचायला भेटले. परिंदा मधे एकूण सतरा कथा आहेत आणि त्या तीन प्रकारच्या कथा आहेत. ग्रामीण माणसांच्या कथा, ग्रामीण आणि शहरी सास्कृत्या मधे गुर्फुटून गेलेल्या माणसांच्या कथा, विनोदी कथा अनिकाही गूढ कथा. इटू पासून वाचायला सुरुवात करताना आपली मानसं, माझा पहिला विमान प्रवास पर्यंत येताना आपल्याला अंदाज सुद्धा येत नाही कि लेखक आपल्याला शेवटी अद्भुत दुनियेची सफर पण करणार आहोत. पोकळी आणि साती आसारा ह्या कथांनी लेखकाची वेगळीच ताकद पुढे येते. “नियती” आणि “वनराज” मधे लेखकाने आपण सगळे नियतीच्या हातचे बाहुले आहोत हे सिद्ध केले आहे.पात्राना नियतीने ठरवलेल्या ठिकाणी घेऊन जातानाचा प्रवास वाचावा तर विकास गोडगेंच्या लेखणीतून असंच वाटत राहते. वनराज मध्ये लेखकाने आपल्याच मुलाला आपल्याच आईशी लग्न करायला लावणारी नियती खूप भेदकपने साकारली आहे.
एकूण मला आवडलेल्या आणि संग्रही असाव्या अशा पुस्तकांपैकी एक
YOGESH DIGHE
12 Jul 2016 05 30 AM
थंडीच्या दिवसात सात आठ सौंगडी शेकोटीभोवती कोंडाळं करुन बसतात अन तंबाखू चुन्याची चंची फिरवली जाते.बार भरले जातात अन सूत्रधार रंजक गोष्टी सांगायला सुरवात करतो.रात्र कधी सरत जाते हे कळत पण नाही. अशीच गोष्ट सप्टेंबर महिन्यात मराठी साहित्यविश्वात झाली आहे. सोशल मिडियावरील प्रसिद्ध लेखक विकास गोडगे यांचा ’परिंदा’ कथासंग्रह २५ सप्टेंबरला प्रकाशित झाला आहे.पेशाने इनव्हेस्टमेंट बँकर अन व्रुत्तीने साहित्याचे विद्यार्थी असलेल्या गोडगेंनी आपल्या पुस्तकातून ग्रामीण जीवनाचा धांडोळा घेतला आहे . ग्रामीण जीवनातील रंजक कथा सांगताना विकासराव वेगळ्या पद्धतीने प्रबोधन पण करतात.प्रत्येक कथेचा आक्रुतीबंध वेगवेगळा आहे आणि कथेच्या शेवटी संक्षेपात केलेले चिंतन वाचकाला अंतर्मुख केल्याशिवाय राहत नाही. ’परिंदा’ कथेतील परिंदाआप्पा आणि सुर्कीची प्रेमकहाणी त्यांनी एका वेगळ्या पातळीवर नेऊन ठेवली आहे.नैतिक अनैतिकतेच्या चौकटीबाहेर जाऊन झालेली प्रेमभावना सुर्कीच्या डोळ्यात एक सुरस स्वप्न निर्माण करते पण पांढरपेशा जीवनाचे यम नियम परिंदाला चाकोरीबद्ध मार्गाने जायला प्रव्रुत्त करतात.साधी सोपी आणि चपखल भाषा वाचकाच्या मनाचा सुरवातीपासूनच ठाव घेते .