रक्ताचे नाते हे जन्मतःच तयार होते; मात्र आयुष्यात अशी अनेक नाती असतात जी नकळत निर्माण होतात. रक्ताच्या नातेसंबंधातही मैत्रीचे, विश्वासाचे नाते असेल, तर ते जास्त दृढ होते. नात्याचे हे भावबंध जपणे आजच्या ‘मी व माझे कुटुंब’ या पलीकडे न पाहण्याची दृष्टी असलेल्या जगात खूप महत्त्वाचे असल्याचे कुमुदिनी भार्गव यांच्या ‘चला नाती जपूया...’मधील लेखांमधून सांगितले आहे.
माणूस जन्माला येतो तेव्हा त्याचे स्वतःचे अस्तित्व निर्माण होते. म्हणूनच आधी स्वतःचे स्वतःशी नाते घट्ट करणे आवश्यक असते, हा पहिला धडा यात आहे. कुटुंबातील विविध नात्यांची गुंफण आणि ती कायम ठेवण्यासाठी आवश्यक बाबी नमूद केल्या आहेत. आई-मुलगी, एकटे अपत्य-आईवडील, पती-पत्नी, भावंडे, सासू-सून, नणंद-भावजय अशा कौटुंबिक नात्याचे पदर उलगडले आहेत. या शिवाय दोन स्त्रियांमधील नाते, शेजारधर्म, वृत्तपत्र-वाचक, डॉक्टर-रुग्ण, पोलीस-जनता, देव-भक्त, ग्राहक-विक्रेता, नेता-जनता, मालक-नोकर, गुरु-शिष्य अशा सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक पातळीवरील नात्यांवारही प्रकाश टाकला आहे.
‘चला नाती जपूया...’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5446235038071658437