जिहाद
Anuvadit Boluvaru Mahamad Kui Boluvaru Mahamad Kutri Boluwaru Boluwaru Mahhamad Kutri Hussain Jamadar Jihad Mehata Publishing House Mehta Publishing House Samajik Social Translated Translation अनुवादित जिहाद बोळुवारू महमद कुञि मेहता पब्लिशिंग हाऊस सामाजिक हुसेन जमादार
Available in 2-3 days

 
Hard Copy Price: R 290 / $ 4.50
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Summary of the Book
जिहाद' म्हणजे केवळ धर्मयुद्ध नव्हे. एखाद्या ध्येयाच्या सिद्धीसाठी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावणे व जिवाच्या आकांताने प्रयत्न करणे म्हणजे 'जिहाद' होय. हुसेन जमादार यांनी मुस्लिम समाजसुधारणा हेच आपल्या जीवनाचे महान उद्दी मानले. आणि स्वत:ला तन, मन, धनाने या कार्यासाठी वाहून घेतले.
मुस्लीम सत्यशोधक चळवळ हा मुस्लीम समाजाच्या प्रबोधनासाठी केला गेलेला अत्यंत प्रभावी प्रयत्न आहे. प्रबोधनाची चळवळ ही क्रांती असते. दीर्घकाळाने का होईना पण समाजाला त्या मार्गावर यावेच लागते. कारण त्यातच समाजाचा विकास असतो. ती समाजाची गरज असते. व त्यासाठी राजकीय फायदे तोटे न पाहता काहींना हे सतीचं वाण घ्यावं लागतं. जमादार यांनी हे सतीचं वाण घेतलं. त्याचीच कहाणी म्हणजे हे पुस्तक.

मुस्लीम स्त्रीला माणूस म्हणून अधिकार मिळावेत, तिला शिक्षण घेता आले पाहिजे, तिला बुरख्याची सक्ती नको, मुस्लीम पुरुषाला मनमानी तोंडी तलाक देण्याचा अधिकार आहे तो रद्द करावा, तलाक मिळालेल्या स्त्रीला पोटगी मिळावी, सवतबंदीचा कायदा मुस्लीमांना लागू व्हावा हे सत्यसोधक चळवळीचे मुख्य मुद्दे होते. याबरोबरच मुस्लीम समाजाने आपल्या परिघातून बाहेर पडावे, पाकिस्तान इस्लामी राष्ट्र असले तरी भारतीय मुस्लीमांनी त्याच्याबद्दल प्रेम दाखवू नये, राष्ट्रीय चळवळीत मुस्लीमांनी सहभागी व्हावे, प्रादेशिक भाषेतून शिक्षण घ्यावे, कुटुंबनियोजनाचा स्वीकार करावा, छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत त्यांचा आदर करावा, मुस्लीम येथील भूमिपुत्र आहेत म्हणून त्यांना भारतात राहण्याची व स्वत:चा विकास करण्याची संधी मिळावी अशा प्रगतीशील ठोस विचारांचा प्रसार मुस्लीम सत्यशोधक चळवळीने केला. मुस्लीम समाजाचे दारिद्र्य, अज्ञान यासाठी काहीतरी करण्याची उर्मी जमादार यांच्या अंत:करणात होती. त्यामुळे त्यांनी हेच जीवितकार्य निवडले.

आणखी काही वर्षांतच मुस्लीम स्त्रीची धर्माच्या बंधनातून सोडवणूक होईल. ती मुक्तपणे श्‍वास घेऊ शकेल. यात जय पराजय काही नाही, असा विश्‍वास त्यांना वाटतो. मुस्लीम समाजाचं दर्शन या आत्मकथनातून घडतं. लेखकाच्या संवेदनशील, कृतीशील व्यक्तित्वाचं दर्शन वाचकाला झपाटून टाकतं.
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Google SignIn
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Password
Country

Forgot Password?
Google SignIn
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat