Summary of the Book
वास्तववादाचा किंवा अद्भुतवादाचा असा कुठलाच झेंडा मतकरींनी खांद्यावर घेतलेला नाही. ज्यातून एखादी ‘आकृती’ साकार होईल, असे त्यांना जाणवते, ती कथावस्तू व त्याला अनुरूप असा वाङ्मयप्रकार ते निवडतात. ‘जौळ’ सुरुवातीला एक ‘कथा’ होती. लिहितालिहिता तिने प्रथम दीर्घकथेचा, नंतर कादंबरीचा आकार धारण केला. लेखकाने हे घडू दिले. कारण एकदा पात्रांना निवेदनाच्या प्रवाहात सोडल्यावर चांगला लेखक त्यांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीने पुढे जाऊ देतो, आपल्या पूर्वकल्पनांचे ओझे त्यांच्यावर लादत नाही. ही ‘वाङ्मयीन तटस्थता’ ‘जौळ’ मध्ये मतकरींना चांगली साधली आहे.
‘जौळ’ मधील वास्तव हे कठोर जीवनस्पर्धेत मागेमागे फेकल्या जात असलेल्या कनिष्ठ मध्यमवर्गीय संसाराचे आहे. तितकेच करुण व दाहकही, याही वास्तवदर्शनाची नोंद घेतली जायला हवी.