‘आधी प्रपंच करा नेटका’ असे रामदास यांनी सांगितले आहे. समर्थ रामदास म्हणजे केवळ पारमार्थिक संत नव्हेत, तर समाज शिक्षक, कवी, उपदेशक, रामोपासक, कुशल संघटक आणि ज्येष्ठ व श्रेष्ठ संत, असे त्यांचे व्यामिश्र व्यक्तिमत्त्व होते. माणसाचे आयुष्य सफल व्हावयाचे असेल, तर त्याचे मन ताब्यात हवे, म्हणूनच समर्थांनी मनाला उपदेश करणारे श्लोक लिहिले. यातील शिकवणुकीचे महत्त्व आजच्या काळात प्रकर्षाने जाणवते. श्लोकांचा अर्थ, संदर्भ अरुण गोडबोले यांनी ‘श्री मनाचे श्लोक एक मागोवा’ यातून सांगितले आहेत.
सकल कला व विद्येचा दाता श्रीगणेश श्रीगणेश व देवता शारदेला वंदन करून ‘गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ, आरंभ तो निर्गुणाचा नमू शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंथ आनंत या राघवाचा’ या श्लोकाने समर्थांनी सुरुवात करून २०५ श्लोकांतून सोप्या भाषेत तत्त्वज्ञानाशी ओळख करवून दिली आहे. या सर्व श्लोकांचा अन्वयार्थ विविध उदाहरणे देत लेखकाने समजून सांगितला आहे.
‘श्री मनाचे श्लोक एक मागोवा’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5229111302289995799