भारतीय समाजरचना ही जातीव्यवस्थेवर अवलंबून आहे. यात देशातील सर्व राज्यांत विविध नावाने अस्तित्वात असलेला मातंग हा एकमात्र समुह आहे, अशी माहिती देऊन प्रा. सोमनाथ डी. कदम यांनी ' विसाव्या शतकातील मातंग समाज 'मधुन सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक परिवर्तनाला सामोरे गेलेल्या मातंग समाजाचा इतिहास कथन केला आहे. मातंग संज्ञेचा अर्थ, त्याची व्युत्पती, मातंग जातीची उत्पती, त्या विषयीच्या दंतकथा, मातंगांचा प्राचीन धर्म, मातंग राज्ये व त्यांचे राजे, मातंग समाजातील संत, भारतातील मातंग समाज व त्यातील जाती- पोटजाती, महाराष्ट्रातीस मातंग समाज याची माहिती समजते. भारतात ब्रिटिशांचे राज्य आल्यावर मातंग समाजाची स्थिती, त्यांची बोलीभाषा, शैक्षणिक स्थिती, विविध चळवळींतील त्यांचा सहभाग याबद्दल नमूद करून आंबेडकरपूर्वकालीन, आंबेडकरकालीन व स्वातंत्र्योत्तर मातंग समाजाचे वर्णन करताना समाजासाठी झटलेल्यांचे व्यक्तिचित्रण, संस्था- संघटना, लढे- चळवळी यांचा इतिहास सांगितला आहे. समाजाचे समकालीन वास्तव व पुढील दिशाही यातून स्पष्ट केली आहे.
‘विसाव्या शतकातील मातंग समाज’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=4889560789510528448