Summary of the Book
कविता हा समाजपरिवर्तनासाठी आवश्यक अशा क्रांतीचं सामर्थ्य असणारा साहित्यप्रकार. कवी विश्वास वसेकर यांनी या काव्यप्रकाराचं हे सामर्थ्य अचूक ओळखलं आहे. ललित, कोशवाङ्मय, अनुवाद, समीक्षा अशा वेगवेगळ्या साहित्यप्रकारात वसेकर यांनी लेखन केलेलं असलं, तरी ते रमतात खरे कवितेतच.
"अंग्कोरवट' काव्यसंग्रहातली वसेकरांची कविता ही सामाजिक, राजकीय मूल्यांचं महत्त्व सांगणारी आहे. स्वातंत्र्योत्तर काळात झालेलं राजकीय अध-पतन सर्वांनाच दिसत आहे;