Hard Copy Price:
25% OFF R 140R 105
/ $
1.35
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Preview
Summary of the Book
जोतीरावांच्या कार्याबद्दल अतीव आदर बाळगणाऱ्यांनीसुद्धा जोतिरावांकडे एक समाजसेवक, तळमळीचा कार्यकर्ता या नात्यानेच पहिले. जोतीराव हे ताकदीचे विचारवंत होते. त्यांचे कार्य हे केवळ सद्भावनेपोटी किंवा करुणेतून घडले असाच या मंडळींचा समाज असावा. वस्तुतः जोतीराव हे उच्च कोटीचे विचारवंत होते. त्यांच्या विचारांना एक विकासक्रमही दाखवता येतो. त्याचप्रमाणे त्यांचे कार्यही या वैचारिकतेशी जोडता येते. महात्मा फुले यांच्या निवडक साहित्याचे संपादन करताना मला हा मुद्दा विशेष जाणवला. जोतीरावांच्या समग्र आणि निवडक साहित्याच्या ग्रंथात लिहिलेल्या प्रस्तावनेचे नंतर वाचन करत असता माझ्या लक्षात आलेले की, कळत-नकळत आपण महात्मा फुले यांचे वैचारिक चरित्राच लिहून गेलो आहोत. या चरित्रात अशी घटनाक्रमयुक्त चरित्र किंवा कृती आहे आणि नंतर त्यामागचे तयातून व्यक्त होणारे विचार अशी रचना नाही किंवा आधी विचारांच्या आराखड्याची मांडणी व त्याच्या आधारे घटनांचे अथवा कृतींचे विश्लेषण अशीही विभागणी नाही. जोतीरावांच्या ग्रंथरचनांमधून त्यांच्या विचारांची मांडणी करता करता त्यातूनच जोतीरावांनी केलेल्या कृत्यांची घटनात्मक मांडणी आपोआपच पुढे येते. या चरित्राला जोतीरावांचे वैचारिक चरित्र म्हणता येईल, इतके हे दोन्ही घटक पुरेशा स्पष्टपणे दृग्गोचर होतात.