Summary of the Book
खेड्यांपर्यंत, आदिवासी पाड्यापर्यंत शाळेची इमारत पोचली.
पण शिक्षण पोचलं का?
शाळेच्या वर्गात पोरं बसली. शाळा भरली.
पण पोरं शिकली का?
शाळेत जाऊनही मुलं निरक्षर का?
अनुदान असूनही आश्रमशाळेत लेकरं उपाशी का?
अनागोंदी कारभार आणि आदिवासी भागातील प्राथमिक शिक्षणाच्यादुरवस्थेचा शोध घेणारी एका कार्यकर्त्याची शोधयात्रा...
भर पावसाळ्यात गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, नंदुरबार, यवतमाळ, नांदेडजिल्ह्यातील दोनशे गावांमध्ये जाऊन घेतलेला शिक्षणाचा हा शोध...
शाळा आहे पण शिक्षण नाही ! हे कटू सत्य अधोरेखित करणारा...वाचकाला अस्वस्थ करत शैक्षणिक प्रश्नांविषयी जागा करणारा लेखजोखा...