Summary of the Book
अक्षर आणि अक्षय वाङमयातील 'रामायण' या विषयावरील सौ. अलका मुतालिक यांचा हा ग्रंथ श्रवणानंद देऊन मग वाचनानंदाची विशेष अनुभूती देणारा आहे.
'रामकथा' सांगितली ती लिहिली. या भूमिकेतून अलकाताईंच्या रामायण लेखन प्रवासात महर्षी व्यास- वाल्मिकींपासून नाथ महाराज, गोस्वामी तुलसीदास, समर्थ रामदास स्वामी, वेणास्वामी, डॉ. देशमुख काका, पू . मंदाताई आणि श्रद्धेय मुळेशास्त्री अशा अनेक प्राचीन- अर्वाचीन महानुभावांनी घडविलेले रामकथा वाङमय या सगळ्यांचे अवलोकन करून सौ. अलकाताईंनी आपल्या रामकथेची मांडणी अत्यंत ओघवत्या शब्दात सादर केली व तिचेच हे मूर्तिमंत शिल्प प्रस्तुतच्या ग्रंथाद्वारे वाचकांसाठी सिद्ध केले आहे.
'रामायण कथासागर' हा सीमित प्रसंगावर अस्धारित ग्रंथ असला तरी साहित्य मूल्य, विषय वैविध्य आणि भाषा समृद्धी यांच्या समर्थ व सहज मांडणीद्वारे 'रामायण' मनावर ठसविण्यात अलकाताई यशस्वी झाल्या आहेत.
या सुंदर 'रामायण कथासागर' ग्रंथाच्या प्रकाशनाने 'मोरया प्रकाशन' च्या दर्जेदार प्रकाशित ग्रंथमालेमध्ये 'मूल्यवान' भर पडली आहे. प्रकाशक आदरणीय श्री. दिलीप महाजन यांचेही अभिनंदन.
वाचक या सुंदर रामकथेचे यथोचित स्वागत करतील असा विश्वास आहे.