Summary of the Book
दहशतवाद्यांनी दि. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर हल्ला केला. या हल्ल्याचा अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार म्हणून पाहिलेला प्रवास आणि केलेला अभ्यास यांवर आधारित हे लेखन आहे. बातम्यांच्या पलीकडचे जग शब्दांत पकडण्याचा हा प्रयत्न आहे.प्रारंभी त्यांनी दहशतवादविरोधी पथकाचे कार्यक्षम अधिकारी हेमंत करकरे यांच्या हत्येचे चित्रण केले आहे
याबरोबरच मंत्रालय,पत्रकार परिषद आणि आदींची माहिती येते. वेगवान घडामोडीचा दुसरा दिवस, तिसरा दिवस 'एनएसजी' णे मिळवलेला ताबा, ऑपरेशन सायक्लॉनचा चौथा दिवस,विविध पातळींवरील बैठकांचा पाचवा दिवस, सहावा दिवस आर आर पाटील यांच्या राजीनाम्याचा, त्यानंतरचे सातवा, आठवा, नवव दिवस आणि मग पडद्यामागचे वास्तव अशा क्रमाने पुस्तक उलगडत जाते