Summary of the Book
अलीकडील काळात वाद्यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने आवाजातील माधुर्य हरविले आहे. आजच्या गाण्यांमधील भाषाही बदलली आहे. बहुतांश गाणी काही काळानंतर लक्षातही राहत नाहीत. या उलट जुन्या गाण्याचे आहे. त्यावेळच्या गाण्यांसह, गायक - गायिका, चित्रपट, कलाकार आदींबद्दलचं आपलं आकर्षण आजही कमी झालेलं नाही.
त्यामुळेच विलास करंबेळकर यांनी लिहीलेलं हे पुस्तक आवर्जून वाचावसं वाटतं. गीता बाली, शैलेंद्र, शमशाद बेगम, महंमद रफी, सुमन कल्याणपूर, मुकेश यांच्यासारख्या गायक-गायीकांसह वैजयंतीमाला, शम्मी कपूर, सुनील दत्त, आशा पारेख आदी गाणाऱ्या कलाकारांचीही बहारदार दर्शन पुस्तकातून घडतं, जुन्या अवीट गोडीच्या गाण्यांना मिळालेलं यश, त्यामागची मेहनत, कोणती गाणी कोणत्या रागावर आधारित आहेत. आदी माहितीही समजते.