Summary of the Book
पोलिसांना जनतेचे रक्षक म्हटले जाते. पोलिसांच्या कामगिरीकडे दृष्टीक्षेप टाकला, तर त्यातील सत्य लक्षात येते. त्यातून महाराष्ट्र पोलीस हे धाडसी आणि मेहनती. अशाच काही धडाडीच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या कामगिरीची ओळख अरुण हरकारे यांनी पुस्तकात करून दिली आहे.
सरंगल, बाजारे, प्रदीप काळे, दाभाडे, विलास गंगावणे, अरुण भगत, प्रफुल्ल भोसले, दिलीप बोरस्ते, गौतम रणदिवे, दत्तात्रय पांढरे, भीमदेव राठोड, भरत शेळके, फटांगरे, डोळस, पोफळे, श्रीमती क्रांती पाटील, आदी पोलिसांची आदींची ओळख यांतून होते. एखाद्या प्रकरणाचा तपास कसा केला गेला, गुन्हेगाराचा छडा कसा लावला, गुन्ह्याचे प्रकरण हाताळले कसे हेही या रोमांचकारी घटनांमधून समजते