Summary of the Book
गेल्या काही महिन्यांत पाकिस्तानविषयक अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली असून ज्येष्ठ पत्रकार अभय गोखले यांचे ‘हुकूमशहांच्या देशात’ हे त्यापैकी एक. १९४७ मध्ये फाळणी होऊन पाकिस्तानची निर्मिती झाली. लोकशाही मानणारा जगातील सर्वात मोठा देश म्हणून भारताचा गौरव होतो. याउलट पाकिस्तानात मात्र अयूब खान यांच्यापासून मुशर्रफ यांच्यापर्यंत मोठा कालखंड हुकूमशहांनी गाजवला. तेथील लोकशाही व्यवस्थेवर हुकूमशाहीची सततची टांगती तलवार आहे आणि ती दूर होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत, असे लेखकाचे ठाम मत आहे. एकंदर २६ प्रकरणांमधून अभय गोखले यांनी पाकिस्तानमधील घडामोडींचा अभ्यासपूर्ण वेध घेतला आहे. पाकिस्तान हा आवडीचा विषय असणाऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणारे हे पुस्तक आहे.