Summary of the Book
ब्रिटिश वसाहतवादाचा भारतावर काय परिणाम झाला, याचा शोध घेणारे हे पुस्तक. दिल्ली विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेल्या पवन के. वर्मा यांनी भारतीय परराष्ट्रसेवेत प्रवेश केल्यावर विविध देशांमध्ये काम केले आहे. वसाहतवादी राजवटीतून निर्माण झालेल्या गुंतागुंतीच्या प्रश्नांचा आणि त्यातून आलेल्या काही गोष्टींचा जगावर कसा परिणाम झाला, त्याचवेळी जागतिकीकरणाचाही परिणाम कसा झाला, याबद्दल आपली मते श्री. वर्मा यांनी या पुस्तकात मांडली आहेत. पत्रकार भगवान दातार यांनी या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे.