Summary of the Book
भारतीय कालगणना सर्वांना समजावी, त्यांचे महत्व, शास्त्रशुद्धपणा
लक्षात यावा आणि त्याबद्दल गौरवाचा भाव निर्माण व्हावा, यासाठी
नचिकेत प्रकाशन नागपूरने, 'गौरवशाली भारतीय कालगणना' हे
छोटेखानी आटोपशीर पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे.
अमेरिकेसह जगभर सोमवार नंतर मंगळवारच येतो, तो तसाच का येतो, याचे उत्तर फक्त भारतीय कालगणनाच देऊ शकते आणि जेव्हा भारत गुरूस्थानी होतो तेव्हा सार्या जगाने ही भारतीय पद्धती उचलली म्हणूनच जगभर सोमवार नंतर मंगळवारच येतो? या व अशा अनेक प्रश्नांची मनोरंजक व नवर्धक माहिती व उत्तरे या पुस्तकात दिली आहे.
याशिवाय 'युगाब्द' म्हणजे काय? तिथी कशाला म्हणतात? मुहुर्त कोणते? युगे २८ उभा विटेवरी,
असे विठ्ठलाला म्हणतात. ही अठ्ठाविस युगे कोणती? काळाचे सर्वात लहान माप कोणते? ब्रम्हांडाचा काळ किती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे यात आहेत. कालगणनेच्या सर्व संकल्पनांची माहिती थोडक्यात पण सोप्या स्पष्ट शब्दात यात दिली आहे.
सर्व कालगणनांची तुलनात्मक माहिती पण यात आहे तसेच. वाढदिवस कसा साजरा करावा?,
कोणत्याही धार्मिक व शुभ कार्याच्या वेळा जो संकल्प करावयाचा असतो. तो पण यात पूर्ण दिला
आहे. आज जग २१ व्या शतकात नाही तर ५२ व्या शतकात आहे, हे सर्वसामान्यांना कळावे कालगणना हा केवळ ज्योतिष्य व शास्त्रज्ञांचा विषय नाही तर सर्वसामान्य व्यक्तीचाही समजायचा विषय आहे.
तेव्हा त्यांना तो समजावा म्हणजेच ते त्याला व्यवहारात आणू शकतील, म्हणून हे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक आवर्जून वाचावे आणि भारतीय कालगणनेची माहिती करून घ्यावी व गौरवान्वीत व्हावे अशी माहिती यात ठासून भरली आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी वाचावे.
असे हे पुस्तक प्रत्येक शाळेत, ग्रंथालयात व चोखंदळ वाचकांजवळ असणे आवश्यक आहे. नचिकेत प्रकाशनाने माहितीपर पुस्तकांची आपली परंपरा या मुळे अधिकच समृद्ध केली आहे.
गौरवशाली भारतीय कालगणना.