Summary of the Book
एका वृद्ध महिलेला रस्ता ओलांडायला मदत करण्याऐवजी एक माणूस उद्धट बोलतो, हा प्रसंग कवी सुयोग चौधरी यांच्या मनाला खूप लागतो. त्यातूनच या काव्यसंग्रहाचा जन्म झाला आहे. माणुसकी हाच केंद्रबिंदू धरून केलेल्या कविता येथे आहेत. साठ कवितांमध्ये कवी हताश तरुणांचं दुःख मांडतो, तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथाही सांगतो. आयुष्याच्या लढाईत माणुसकीचा ओलावा कसा जपला पाहिजे याकडे कवी लक्ष वेधतो. माणुसकीचा दहावा या कवितेत कवी समाजाची उदासीनता आणि निगरगट्टपणा यावर तीव्र शब्दांत कोरडे ओढतो.