Summary of the Book
वसंत गायकवाड यांनी लिहिलेल्या या कादंबरीला जातीय दंगलीची पार्श्वभूमी आहे. दंगल कशावरून तरी सुरू होते, पण ते कारण तत्कालिक असतं. खरं तर त्यामागं खूप दिवसाचं नियोजन असतं. राजकारणी मंडळी आणि गुन्हेगारी जगतातील व्यक्तींनी डावपेच आखून दंगल भडकवलेली असते. "सत्यमेव जयते'मध्ये हे सारं नेमकेपणानं आणि प्रभावीपणानं मांडलं आहे. गावपातळीवरचं राजकारण, पोलिस खात्याची भूमिका आणि महापुरुषांच्या जयंतीचा दिवस दंगलीसाठी निवडणं अशा बारीकसारिक बाबींतून कादंबरी पुढं सरकत जाते. राज्यात काही वर्षांपूर्वी घडलेल्या काही घटना आणि त्याला दिलेली कल्पनेची जोड यामुळे वाचक कथानकात गुंतला जातो. लेखकाची ही तिसरी कादंबरी आहे.