Anmol Patil - JJ Magadum College, Jaysingpur
25 Sep 2013 10 31 AM
पूर्वीची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक घरात म्हातारी माणसे असायचीच. प्रकृतीच्या, वयाच्या मानाने व्यवस्थित, काही थकलेली, काही शांत स्वभावाची, काही तापट, पण शेवटपर्यंत ती आपल्या मुलाबाळांमध्ये असायचीच मग आताच ही परिस्थिती का निर्माण झाली? एक तर जागेची टंचाई. एक बेडरूम हॉल बॅंकेकडून कर्ज काढून वगैरे घेतला तरी नवरा-बायको आणि एक किंवा दोन मुले यांच्यासाठी कमीच पडतो. मग आई-वडील असतील तर त्यांना ठेवायचे कोठे, हा प्रश्न पडतो.
Sham Gurav - Surat
25 Sep 2013 10 30 AM
वृद्धाश्रम ही संकल्पना मूळची परदेशातील पण आपल्याकडे ती आता चांगलीच रुजली आहे. देशभरात वृद्धाश्रमांची संख्या एक हजारांच्यापेक्षाही अधिक आहे. वृद्धाश्रमांची संख्या वाढतच आहे. आजकाल अनेकांना आपल्या वृद्ध आई-वडिलांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. अनेक मुले नोकरीसाठी परदेशाचा मार्ग अवलंबत असल्याने त्यांचे वृद्ध आई-वडील एकाकी होतात. अशा वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आले आहेत. जे आपल्या परिवारासोबत राहत नाहीत अथवा निराश्रित असतात, त्यांच्यासाठी वृद्धाश्रम सुरू करण्यात आले आहेत.
Prashant Patil - Satara
22 Sep 2013 12 41 AM
आजी-आजोबा हे खरे तर आई-वडील आणि मुल यातील दुवा. लहान मुलांच्या आशा,आकांशा त्या मुलाच्या आई-वडीलापर्यत पोहोचवायचा हुकमी एक्का कारण दांडगा अनुभव आणि वयपरत्वे येणारे सामंजस्य हे कारण. मुल जेवढे आई-वडीलाकडे रमत नाही तेवढे आजी आजोबाकडे रमते. आई-वडील जास्तीत जास्त मुलाला शिक्षण, घर, जमीन,पैसा,राहणीमान उंचावून देतील पण आजी आजोबांची एकएक वाक्य त्याचे जीवन विजेशिवाय उजळूवून टाकेल, महत्वाचे आजी आजोबाकडून येणारे संस्कार पुढील पिढीला द्यायचे काम करतात, जे आजचे आई वडील धाकधुकीच्या जीवनात द्यायचे विसरतात.
मोहन धारिया - माजी केंद्रीय अर्थ मंत्री
22 Sep 2013 12 39 AM
सतत आनंदी रहा. कार्यरत रहा. समाजसेवा करा, असा सल्ला सर्व ज्येष्ठाना मी देईन, माजी केंद्रीय मंत्री आणि वनराई संस्थेच्या माध्यमातून मी सर्वत्र प्रवास करतो. विविध कार्यक्रमांना जातो. आता वय झाल्या मुळे प्रवास झेपत नाही. वनराई मासिकाचे व दिवाळी अंकाचे काम सुद्धा खूपच वाढले आहे. माझ्या आयुष्यात अनेक ज्येष्ठ नागरिक संघटना बघितल्या परंतु इतके सुंदर पुस्तक बनविण्याचा प्रयत्न करणारी कदाचित माझ्या माहिती प्रमाणे जयसिंगपूर येथील ज्येष्ठ नागरिक संघटना ही पहिलीच असावी. सुनील पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले हे वाचून आनंद झाला. सुनील हा एक खूपच कल्पक व होतकरू तरुण आहे. त्याने आमच्या वनराई संस्थेवर टपाल खात्याकडून विशेष पाकीट प्रकाशित करण्यासाठी मोलाची मदत केली. खरं तर ही टपाल खात्याकडे प्रस्ताव दाखल करण्याची मूळ संकल्पना सुनीलचीच होती. सुनील तुमच्या संघा साठी खूपच मदतगार ठरू शकतो. आमचे सहकारी सा. रे. पाटील यांची ही काही मदत घेता येईल. ज्येष्ठानंद ची एक प्रत सा. रे. पाटलांना आवश्य द्या. शिरोळ ला आल्यावर सुनील कडून ज्येष्ठानंद ची प्रत घेईन किंवा कदाचित सुनील मला पाठवेल सुद्धा.
संजय चहांदे - प्रभारी कुलगुरू पुणे विद्यापीठ
22 Sep 2013 12 28 AM
आजी-आजोबा, आई-वडील हेच घराचे खरे वैभव आहे. संस्काराचे विद्यापीठ आहे. त्यांचा नव्या पिढीने आदर राखावा. हे विद्यापीठ असणे अडचणीचे नव्हे तर भाग्याचे असते. ज्येष्ठानंद पुस्तकाची संकल्पना आवडली. प्राचार्य डॉ. सुनील पाटील यांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांचे विचार जगभरातील हजारो लोकां पर्यंत पोहचविण्याचे कार्य आपला ज्येष्ठ नागरिक संघ करीत आहे ही खरोखरच कौतुकाची बाब आहे, सुनीलना फोन करून सदर पुस्तकाची प्रत मागवून घेतो, मुख पृष्ठ तर अप्रतिम झाले आहे. अंतरंग मधून पुस्तकाची उंची कळते. सदर पुस्तकातील काही संकल्पना / विचार पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करेन... पुढील उपक्रमास सुभेच्या...
साहित्यिक प्रवीण दवणे - पुणे
22 Sep 2013 12 21 AM
"आम्ही म्हातारे नाही, "महा तारे' आहोत. आमच्या ज्ञानाचा, अनुभवाचा उपयोग व्हावा,'' अशा शब्दांत ज्येष्ठ नागरिकांनी रविवारी आपल्या भावना व्यक्त केल्या. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या गाण्यांच्या तालावर डोलत-नाचत त्यांनी आनंदही व्यक्त केला. निमित्त होते आनंद मेळाव्याचे. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने जनसेवा फाउंडेशन व इतर संस्थांच्या वतीने हा मेळावा आयोजिण्यात आला होता.
वैभव सांकला - कार्यकारी संचालक, 'अॅड्रॉइट टॅक्स सव्हिर्सेस'
22 Sep 2013 12 17 AM
ज्येष्ठानंद पुस्तकाची संकल्पना आवडली. संबंधित आथिर्क वर्षाच्या शेवटच्या दिवशी किंवा त्याआधी त्या वर्षामध्ये तुम्ही वयाची ६० वषेर् पूर्ण केली असतील तर तुम्ही आयकराच्या दृष्टीने ज्येष्ठ नागरिक म्हणून गणले जाल. म्हणून तुमच्या संघातील सर्व सदस्यांना ही माहिती देवून त्यांना सहकार्य करावे ही विनंती.
Patil Anil - Amravati
22 Sep 2013 12 11 AM
जीवन कमालीचे स्पर्धात्मक आणि ताणतणावाचे झाले आहे, ही काही सबब होऊ शकत नाही. उलट अशा गळेकापू स्पर्धेच्या जगातच अनुभवी आणि ज्येष्ठ मंडळी उत्तम मार्गदर्शक ठरू शकतात. ज्या समाजात आणि देशात ज्येष्ठांना चांगली वागणूक दिली जाते, त्याच देशाची संस्कृती प्रगल्भ, असे म्हटले पाहिजे. आर्थिक-औद्योगिक विकासाचा, संपन्नतेचा कितीही चकचकाट आणि झगमगाट असला, तरी ही प्रगल्भता नसेल तर बाकीच्या गोष्टी पोकळ आहेत. मूल्यविवेकच समाजातून हरपत चालल्याने तो कसा पुनःप्रस्थापित करता येईल, हे पाहिले पाहिजे. त्यालाच सांस्कृतिक विकास, असे म्हटले जाते. निकोप पायावर कुटुंबसंस्था उभी कशी राहील, हे पाहिले पाहिजे. कारण, ती नीट असेल तरच समाजव्यवस्था नीट राहील आणि ज्येष्ठ नागरिकच नव्हे, तर समाजातील सर्व वंचित, उपेक्षित घटकांचे आयुष्यही सुसह्य होऊ शकेल.
डॉ. भगवान नागापूरकर - मुंबई विद्यापीठ, मुंबई
22 Sep 2013 12 09 AM
आपल्या परंपरेत कृतज्ञता या मूल्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. ती भावना जर मनात मुरली असेल, तर ज्या आई-वडिलांनी खस्ता खाऊन आपल्याला मोठे केले, त्यांना लाथाडण्याचा विचारही स्वप्नात येणार नाही. परंतु, अशी मूल्ये जुनाट आणि टाकाऊ झाल्याचा काहींनी समज करून घेतला आहे आणि टोकाच्या व्यक्तिस्वातंत्र्याची पाश्चात्त्य मूल्ये त्यांनी स्वीकारली आहेत. पण, तीही समजून-उमजून आणि विवेकाने स्वीकारली आहेत, असे अजिबात नाही. कारण, हा सगळाच सोईचा मामला आहे. कारण, पाश्चात्त्य जगात मुले ऐन उमेदीत म्हणजे सतराव्या-अठराव्या वर्षीच घर सोडतात आणि मग पुढची वाटचाल स्वतःच्या हिमतीवर करतात. आपल्याकडे या वयात आई-वडिलांचा आधार मुलांना असतो आणि त्यांच्या छत्रछायेतच स्वतःच्या पायावर उभे राहीपर्यंतचा त्यांचा प्रवास होतो. याबद्दलची कृतज्ञता नेमकी कोठे हरविली, याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. ज्येष्ठानंद पुस्तकाची संकल्पना आवडली. प्राचार्य डॉ. सुनील पाटील आमचे मित्र आहेत त्यांच्या कडून हे पुस्तक मागवून घेतो, पुस्तकाचे वाचन झाले कि संपादक मंडळाला माझी प्रतिक्रिया कळवतो.
Raja Patel - Surat
21 Sep 2013 11 56 PM
पण, अशी अनेक घरे असतील, की जेथील हुंदके समाजापर्यंत पोचतही नसतील; तरीही या समस्येचा गंभीर विचार करण्याची वेळ आलेली आहे. आई-वडिलांना न सांभाळणाऱ्या मुला-मुलींना शिक्षेची तरतूद करणारा कायदा मध्यंतरी करण्यात आला. अशाच वेगवेगळ्या वैधानिक उपायांची चर्चा नेहमीच अशा घटनांनंतर होते. परंतु, केवळ कायद्याच्या माध्यमातून हा प्रश्न सुटणारा नाही. पंजाबातील एका निवृत्त न्यायाधीशानेच मुलांपासून आपल्या जीविताला धोका असल्याचा अर्ज न्यायालयात दाखल केल्याची घटना अलीकडेच घडली. घरातूनच निर्माण झालेल्या धोक्यांना पोलिस, कायदा आणि न्याययंत्रणा कशी काय पुरी पडणार? म्हणून हा प्रश्न शेवटी नैतिक मूल्यांशी येऊन भिडतो. गेल्या काही वर्षांत; विशेषतः उदारीकरणाच्या प्रक्रियेनंतर मध्यमवर्गाचा विस्तार अफाट वाढला. लोकांच्या खिशात पैसा खुळखुळू लागला. पैसा वाढताना नैतिक मूल्ये मात्र ढासळत गेली. सर्वांना सामावून घेत, बरोबर नेत जगण्यातला आनंद कळेनासा झाला आणि जी ज्येष्ठ मंडळी म्हणजे घरातील आधार, तीच जोखड वाटू लागली. पण माय बापे केवळ कशी ही संकल्पना आता काळाच्या ओघा आड झाली आहे...
Dadau Swami - USA
21 Sep 2013 11 54 PM
अनंतराम शेट्टी नावाच्या 93 वर्षांच्या ज्येष्ठाला चार मुलगे आणि दोन कन्या अशी अपत्ये आहेत. असे असूनही या पित्याची अवस्था अनाथासारखी झाली आहे. मुलगा आणि सून यांनी त्यांना घराच्या गच्चीत साखळदंडाला बांधून ठेवल्याचे आढळले. मुलाचे तीन मजली घर आहे. परंतु, पित्यासाठी त्या घरामध्ये जागा नाही. कारण, मुलाच्या हृदयातच बहुधा ती नसावी. गच्चीवर तात्पुरत्या शेडखाली त्याने वडिलांची रवानगी केली होती. जवळजवळ वर्षभर तेथे त्यांना ठेवण्यात आले होते. अखेर त्यांची सुटका झाली असली, तरी मुलगा आणि सून यांच्या तावडीतून मला सोडवा, असा आक्रोश हे आजोबा करीत आहेत. आक्रसत आणि विस्कटत चाललेल्या कुटुंबसंस्थेमुळे चार भिंतींच्या आड केवढ्या विदारक शोकांतिका घडताहेत, हे या घटनेने दाखवून दिले. त्यातील क्रौर्य आणि अतिरेक, यामुळे शेजाऱ्यापाजाऱ्यांपासून प्रसारमाध्यमांपर्यंत सगळीकडे तो चर्चेचा विषय झाला. इथे अमेरिकत तर वृद्ध लोकांची अवस्था खूपच हलाखीची आहे, केवळ भौतिक सुविधा असून चालत नाही, त्यामध्ये आत्मिक समाधान असायला हवे, जे मला आपल्या प्रिय भारत भूमी मध्ये मिळत होते ते इथे नाही, पण नोकरी निमित्त मला इथे यावे लागले. आपल्या उपक्रमास माझ्या शुभेछ्या
Ramrao Patil - Pune
21 Sep 2013 11 49 PM
विज्ञान-तंत्रज्ञानातील संशोधनामुळे आयुर्मानात झालेली वाढ, हा माणसाच्या प्रगतीतील लक्षणीय टप्पा आहे. एकेकाळी अगदी असाध्य मानल्या जाणाऱ्या विकारांवरही मात करणारी औषधे शोधून काढत जगणे सुखकर व्हावे, यासाठी माणसाची धडपड अखंड सुरू आहे. परंतु, वैज्ञानिक आघाडीवरील या प्रगतीला निकोप कौटुंबिक-सामाजिक संबंधांची जोड मिळाली नाही, तर कशी दुरवस्था ओढवते, याचा प्रत्यय सभोवताली घडणाऱ्या अनेक घटनांमधून येत आहे. एकीकडे जगण्याचा कालावधी वाढतोय, तर दुसरीकडे जगण्याचे प्रयोजनच हरवतेय. या दुर्दैवी स्थितीतून अनेकांची आयुष्ये काळवंडतात आणि मग मरणाच्या वाटेकडे डोळे लावून बसणे एवढाच भोग त्यांच्या वाट्याला येतो. बंगळूरमध्ये एका ज्येष्ठ पित्याला दुर्दैवाचे जे दशावतार भोगावे लागले, त्याने कुठलीही संवदेनशील व्यक्ती हादरल्याशिवाय राहणार नाही. ज्येष्ठानंद पुस्तकाची संकल्पना आवडली.