Summary of the Book
लोकशाहीत निवडणुकांना विशेष महत्व आहे. देशाचा, राज्याचा कारभार चालविण्यासाठी जनता लोकप्रतिनिधींची निवड करते. यात मतदार हा महत्त्वाचा घटक असून, मतदान हा त्याचा अधिकार आहे. मात्र या अधिकाराबाबत तो स्वतः जागरूक नसतो. लोकप्रतिनिधींनाही संसदीय लोकशाहीची वरवरची माहिती असते. तसेच २००९ मधील लोकसभा निवडणुका प्रथमच पुनर्रचित मतदारसंघानुसार लढल्या गेल्या.
पुनर्रचना म्हणजे काय, त्याचा राजकीय घडामोडींवर झालेला परिणाम, संसद, तिची रचना, कार्य, महाराष्ट्रातील जातनिहाय राजकारण, लोकप्रतिनिधी कायदा, निवडणुकीसंबंधी गुन्हे, त्यांची माहिती, लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना निवडणूक विश्लेषण, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या निवडणुकांचे निकाल, राजकीय पत्र, त्यांची चिन्हे, वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक (लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना) मधून दिली आहे. महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा मतदारसंघ दर्शविणारा नकाशाही आहे. लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, अभ्यासक व मतदारांना सोप्या भाषेत देशातील लोकशाही व्यवस्थेची माहिती यातून मिळते.