Summary of the Book
"भागवत् कृपेने सर्वजण सानंद, सकुशल असाल..." अशा आस्थेने परिपूर्ण संबोधनातून सुरु होणारा सदाशिव गौतम देवधर यांचा पत्रसंवाद मानवी जीवनाच्या अवघ्या अवकाशाला गवसणी घालत जातो. आप्त-गणगोत, सहकारी कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवर, शंकराचार्य आणि सर्व साधूसंत, सामाजिक संस्था तसेच समस्त समाजबांधव अशा सर्वांशी आत्मीय हितगूज करणारा हा पत्रप्रपंच माहितीही देतो, मार्गदर्शनही करतो, वेदनेवर हळूवार फुंकरही घालतो, प्रसंगी कानपिचक्या देतो, खंत व्यक्त करतो, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे जीवनदृष्टीला सकारात्मक प्रेरणा प्रदान करतो.