Summary of the Book
‘मुंबई दिनांक...’, ‘सिंहासन’, ‘स्फोट’, ‘बहिष्कृत’ आणि ‘त्रिशंकू’ यानंतरची श्री. अरुण साधू यांची ही कादंबरी. यांपैकी प्रत्येक कादंबरीचा विषय निवडताना श्री. साधू यांनी कमालीचे वैविध्य राखले आहे. ‘शापित’ या त्यांच्या कादंबरीचा विषय आहे दुष्काळ.
या भीषण दुष्काळात जगण्यासाठी रानभैरी होऊन दिशाहीन भरकटत चाललेली मोजकीच पात्रे, त्यांची एकमेकांहून सर्वस्वी भिन्न असलेली स्वभाववैशिष्ट्ये, त्यांच्यावर ओढवलेले दुर्दैवी प्रसंग आणि सर्व कादंबरीभर पसरलेली नियतीची काळीकुट्ट, घनदाट छाया यांची एकरस प्रतिमा मनावर बिंबत असतानाच आपण एखादा काळजाला हेलावून सोडणारा कलात्मक चित्रपटच पाहात आहोत, असा विलक्षण अनुभव येत राहतो.