Summary of the Book
अगदी सर्वसामान्य मराठी वाचकांपर्यंत बुद्धाचे विचार पोचावेत, ते त्यांच्या मनात, हृदयात सहजतेने साकळावेत, हाच हेतू `धम्मपद’च्या अनुवादामागे आहे.
`वैराने वैर संपत नाही, तर ते प्रेमाने संपते’, `सर्व चांगलेपण घ्यावे, वाईटपण फेकून द्यावे!’ इत्यादी ‘धम्मपदा’तील विचार वैश्र्विक समजूतदारपणा, शांतता, सहजीवन, सर्वत्र प्रेम पसरावे, प्राणिमात्रांवर दया राहावी प्रत्येक जिवाला जगण्याचा अधिकार असावा, सारे द्वेष गळून पडावेत ह्या गोष्टीसाठी उपकारक आहेत. म्हणून प्रत्येक माणसाने, तो मग कुठल्याही तथाकथित धर्माचा असो, वंशाचा असो, देशाचा असो, भाषेचा असो, त्याने माणूस म्हणून ‘धम्मपदा’कडे वळावे.
भगवत्गीता, बायबल, कुराण, झेंडा-अवेस्ता ह्या पवित्र ग्रंथांइतकाच `धम्मपद’ हा ग्रंथही श्रेष्ठ आणि महत्त्वाचा आहे. अखिल माणूसकीचा विचार केला तर कदाचित `धम्मपद’ सर्वश्रेष्ठ आहे.
- लेखकाच्या प्रस्तावनेतून