Summary of the Book
पारशी ही पृथ्वीतलावरील नष्ट होत असलेली मानवजात म्हणून सांगितली जाते. इराणमध्ये झरतृष्टाचे अनुयायी म्हणून या पंथाचा उदय झाला, परंतु हे लोक स्थानिक लढाया व राजकारण यांना कंटाळून इतिहासात वेळेवेळी भारतात येत गेले आणि अखेरीस, भारतात स्थिरावले- येथील जीवनाशी एकरूप होऊन गेले. त्यांनी या देशातील राजकारण, उद्योग व सांस्कृतिक जीवन यांध्ये मोलाची भर घातली. मनुष्यसंस्कृतीचा एक नमुना उदय पावतो, प्रगत होतो व अखेरीस समाप्त कसा होतो याचे दर्शन त्यांच्या नामशेष होण्याने घडणार आहे...