Summary of the Book
विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचे उद्दिष्ट ठेवून मोहन पुराणीक यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. प्राथमिक आणि सवियीच्या वाटणाऱ्या दैनंदिन गोष्टींतूनही व्यक्तिमत्व विकास साधता येतो, हे या पुस्तकातून समजते.
शालेय इयत्तेप्रमाणे पुराणिक यांनी या पुस्तकाची रचना केली आहे. इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी पहिले चार विभाग पाडण्यात आले असून, पाचव्या विभागात विविध प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला आहे.
पहिल्या चार विभागात स्वाध्यायही दिला आहे; तसेच सूर्यनमस्कार कसे घालावेत याची सचित्र माहिती दिली आहे. पाचव्या विभागात सिंगापूरची सुहानी सफर, मालमत्तेचे नियोजन व ज्येष्ठांचे मानसशास्त्र आदी लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.