Summary of the Book
बाळासाहेब सपकाळ यांचा हा कवितासंग्रह. महसूल अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले आहेत. समाजातील वास्तव आणि समाजमनातील अबोल भावनांना मोकळी वाट मिळवून देण्याच्या उद्देशाने त्यांनी ही कविता लिहलीय. एकूण दोन भागांत त्यांनी या कविता लिहिल्या आहेत. एक म्हणजे चिंतन आणि दुसरे म्हणजे मनोरंजन.
चिंतन भागातल्या कविता समाजातील प्रश्नांवर भाष्य करतात, तर मनोरंजनप्रधान भागातल्या काही कविता या निखळ आनंद देणाऱ्या आहेत. दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार यांचे सपकाळ हे सासरे असल्याने हा कवितासंग्रह त्यांनी जिचकरांना अर्पण केलाय.