Summary of the Book
महात्मा बसवेश्वर हे केवळ मानवाकरिता नव्हे तर सकल प्राणीमात्राच्या उत्कर्षाकरिता जन्म घेतलेली महान विभूती होय. विषमतेवर आधारित समाज व्यवस्थेविरुद्ध त्यांनी बंड पुकारले. महात्मा बसवण्णा बंडखोर समाज सुधारक होते.
दया हाच धर्म, वेदांचा फोलपणा गुरु, लिंग, जंगम, देह देवाचे मंदिर, दासोह, सदाचार हाच स्वर्ग, म. बसवण्णाचा सप्त सिद्धांत कायक वे कैलास, एकेश्वरवाद, स्वपूजेची सार्थकता आणि महात्म्य, मनाचिये गुंती, अंधश्रद्धानिर्मूलन, धर्म म्हणजे समता भाव, प्रसारमाध्यमे व शरणजंगम, शरण संस्कृती, अनुभव मंडप, अरिवे गुरु, स्त्री पुरुष समता, स्त्री मुक्ती, स्त्री शरणीचा क्रांतिकारी इतिहास, व्रतवैकल्य त्याचबरोबर महान विभूतीबरोंबर केलेली तुलना उदा. म. बसवण्णा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
दोघेही विश्ववंदनीय युगपुरुष. पददलितांचे मुक्तिदाते, बसवण्णा १२ व्या शतकातील तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर २० व्या शतकातील. दोघांनीही हिंदू धर्मातील प्रतिगामी विचारविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. दोघांनीही परंपरेच्या प्राचीनतेपेक्षा मानवता लाख मोलाची आहे. हे सांगत सत्याग्रहाचे आंदोलन आणि चळवळी उभ्या केल्या. त्यातूनच मानवतावाद, उदारमतवाद, इहवाद अशा विचारप्रणाली, अभिनव अशा समाज क्रांतीतून उदयास आल्या. दोघांनीही वंचितांना आत्मसम्मान शिकविला. स्त्रियांना जागे केले. स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार या जागृतीबरोबर या त्रयसुत्रीवर चळवळ उभी केली. दोघांनीही आपण जन्माला आलेले धर्म नाकारलेत. डॉ. बाबासाहेबांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला तर बसवण्णांनी निती आणि सदचारावर आधारलेला नवीन लिंगायत धर्म स्थापन केला.