Summary of the Book
सर्व धर्म, संत यांनी माणसाला जीवनात समाधानी कसे राहता येईल याचे मार्गदर्शन केले आहे. कुसंगत सोडून सुसंगत अनुसरण्यास सांगितले आहे. संतांनी विविध भाषांमध्ये काव्यप्रकारातून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. सामाजिक कल्याणाचे ध्येय असलेल्या संत कबीर यांच्या दोह्यांनी जात, धर्म, भाषा, संस्कृती, परंपरा, यांच्या सीमा ओलांडून सर्वसामान्यांना जगण्याचे सार सांगितले आहे.
कबिरांचा एक एक दोहा घेऊन त्याचे निरुपण प्राध्यापक डॉ. मोहन खडसे यांनी 'कहत कबीर' मधून केले आहे. नकारात्मक भावना, गैरसमज, अंधश्रद्धा, दूर करून प्रत्येक वयातील माणसाला जीवनप्रवास सावधानतेने कसा करावा, हे संत कबीर दोह्यातून सांगतात. आजच्या संगणक युगातही त्यांचे विचार दिशादर्शक आहेत.