Summary of the Book
हिंदुस्थानातील शेकडो वर्षांच्या महत्वाकांक्षी साम्राज्यविस्ताराच्या संघर्षामध्ये लढल्या त्या - ना राजवटी, ना राजे, ना सैन्य; लढले ते केवळ संकल्प! या भूमीवर सातत्याने झालेली युद्धे हि येथील राजवटींच्या साम्राज्यविस्ताराच्यास संकल्पांची जणू मूर्त प्रतीके बनून उभी राहिली.
भारताच्या या संघर्षमय इतिहासात अनेक साम्राज्ये शस्त्रबळावरच उदयास आली, तरली आणि शास्त्रबळाअभावीच लयास गेली. या युद्धांमध्ये वापरली गेलेली शस्त्रे राज्यकर्त्यांच्या असुरी सत्तालालसेचे, असीम क्रौयाचे, मूर्तिमंत पराक्रमाचे आणि अतुलनीय शौर्याचे आबिल साक्षीदार बनून आज आपल्यापुढे उभी आहेत!
पूर्वजांच्या पराक्रमाचा, शौर्याचा व सखोल शास्त्राभ्यासाचा गौरवशाली वारसा मिरविणाऱ्या शास्त्रांचे स्थान इतिहास अभ्यासकांच्या नजरेत दुर्दैवाने नेहमीच अत्यल्प राहिले आहे किंवा संग्रहालायापुरते मर्यादित राहिले आहे.
भारताचा मध्ययुगीन कालखंड हा भारतीय शस्त्रविद्येचा, शास्त्राभ्यासाचा सुवर्णाध्याय होता. केवळ स्वकीयांनाच नव्हे तर एतद्येशियांनही भुरळ घालणारी असंख्य वैशिष्ट्यपूर्ण व देखणी शस्त्रे या कालखंडात भारतात निर्माण झाली.
हे पुस्तक म्हणजे मध्ययुगीन शास्त्रकर्त्यांच्या कल्पकतेचा, चिंतनशीलतेचा, मध्ययुगीन भारतात अस्तित्वात असणाऱ्या शस्त्रांचा, त्यांच्या उगमाचा, स्वरूपाचा, वैशिष्ट्यांचा आणि सौंदर्यदृष्टीचा घेतलेला एक धांडोळा आहे; मागोवा आहे ... 'शस्त्रवेध' आहे!!