पिंगळ्या (मधुबन माझा मित्र आहे म्हणून)
शेखर, दीपक, विज्या, चंदया, सुधीरराव, मंगलाबाई यांच दैनदिन रुप, एकमेकांच अालटून पालटून केलेल्या वर्णनाचं परफ़ेक्ट टाईमिंग..
शेखर्याने नुसता न पाहता, अनुभवलेला जग..
----
त्याने जग बदलताना पाहिले,
तुझ्या विचाराला पुस्तकातून अनुभवले,
स्वता भाऊक झाल्याचे भासवले
----
पहिल्यांदा कांदबरी लिहीणार्या लेखकाला/तुला त्रिवार सलाम🙏
--
डीजे
गेल्या काही वर्षांमध्ये जग खरंच खूप वेगाने बदललं आहे. यामध्येही व्यवसाय करण्याची पद्धत आणि तंत्रज्ञान यांमुळे खूपच मोठे बदल झाले आहेत. या सर्वच बदलांचा आपणा सर्वांवर परिणाम झाला आहे. परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने असला, तरीही त्याची तीव्रता खूप मोठी आहे. त्यामुळे, आपल्याला या बदलांबरोबर बदलणे आवश्यक आहे आणि नव्या गोष्टी शिकण्याचीही गरज आहे, तरच आजच्या युगामध्ये आपण टिकू शकतो, या गोष्टी ही कादंबरी वाचताना सातत्याने मनामध्ये येतात.
नव्याने करिअर सुरू करणाऱ्या किंवा करू पाहणाऱ्या तरुणांसाठी ही कादंबरी महत्त्वाची ठरू शकते.