‘आई मला खेळायला जाऊ दे न व!’ या गाण्यातील चिमुकला जसे बाहेर खेळण्यास जाऊ द्यावे, यासाठी आईची विनवणी करीत असतो, तसे चित्र बहुतेकांच्या घरात असते. खेळातून मुलांच्या शरीराचा व मनाचा विकास होत असतो. महागडे साहित्य, गणवेश याची गरज न भासता अनेक अस्सल देशी खेळ खेळता येतात. असे खेळ व त्याचे शास्त्र असे दुहेरी महत्त्व शिरीष कुसुम प्रभाकर चव्हाण यांनी ‘भारतीय पारंपरिक खेळ व त्यामागील शास्त्र’मधून सांगितले आहे.
यात खेळाचा प्रकार, तो कसा खेळायचा, मैदान, साहित्य व खेळाडूंची आवश्यकता, शारीरिक घटकानुसार शास्त्रीय फायदे, मुलभूत हालचालींचे कौशल्य, मानसशास्त्रीय फायदे व जीवन कौशल्ये कशी आत्मसात करता येतात, हे स्पष्ट केले आहे. अगदी लपंडाव, लंगडी, जोड साखळी, पकडापकडी, डोंगराला आग लागली...., लगोरी, डब्बा ऐसपैस, लुटूपुटीची लढाई, नाव-गाव-फळ-फूल असे मैदानावर आणि घरात खेळता येणाऱ्या ३५ खेळांचे महत्त्व यातून पटवून दिले आहे; तसेच पारंपरिक खेळाचे सामाजिक फायदेही समजावून दिले आहेत.
‘भारतीय पारंपरिक खेळ व त्यामागील शास्त्र’ या पुस्तकाचा परिचय वाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5589559695058025366