Summary of the Book
डॉ. शेषराव व्यंकटराव शेटे नाव्हा, ता. पालम, जि. परभणी येथे जन्म. प्राथमिक शिक्षण मूळ गावी तर, पदवीचे शिक्षण सरस्वती भूवन, औरंगाबाद येथे. एम.ए . (राज्यशात्र) पदव्युत्तर शिक्षण पुणे विद्यापीठ, पुणे येथून पूर्ण करण्यात आले. इ.स. 1995 पासून वसंतराव नाईक महाविद्यालय, वसरणी, नांदेड येथे राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत. इ.स. 2006 मध्ये 'श्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे राजकीय नेतृत्व' या विषयावर पीएच.डी. पदवी प्राप्त. अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने, विविध चर्चासत्रात सहभाग आणि अनेक शोधनिबंधे प्रकाशित, तसेच अनेक शैशणिक व सामाजिक चळवळीत सक्रीय सहभाग. सन 1999 मध्ये 'अभिनव शिक्षण संस्था' या संस्थेची स्थापना केली असून या संस्थेअंतर्गत इ.स. 2008 मध्ये शिवनेरी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, पालम येथे तर पुढे विश्वभारती महाविद्यालय, सिडको नांदेड अशा दोन महाविद्यालयांची स्थापना केली आहे.अभिनव शिक्षण संस्थेद्वारे प्राथमिक व माध्यमिक स्तरावरही विविध शाळा चालवल्या जातात.
डॉ. परमेश्वर गंगाधरराव धुमाळे मुस्तापूर, ता. नायगांव(खै.), जि. नांदेड येथे जन्म. माध्यमिक शिक्षण जय किसान विद्यालय कोल्हेबोरगांव तर पदवीचे शिक्षण शरदचंद्र महाविद्यालय नायगांव (बा.)येथे तर पदव्युत्तर शिक्षण पीपल्स कॉलेज नांदेड विद्यापिठातून गुणानुक्रमे दुसरा येण्याचा बहूमान प्राप्त.इ.स. 2000 मध्ये एम.ए. (राज्यशास्त्र) या विषयात नांदेड विद्यापीठातून गुणानुक्रमे दुसरा येण्याचा बहूमान प्राप्त. इ.स. 2007 मध्ये एम.फील. ही पदवी प्राप्त तर 2012 मध्ये 'भारताचे आण्विक धोरण: एक अभ्यास' या शीर्षकाखाली राज्यशास्त्र विषयात स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेडद्वारे पीएच. डी.पदवी प्राप्त.आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विविध संशोधन पत्रिकेत 25च्यावर शोधनिबंध प्रकाशित. राज्यशास्त्र विषयाच्या राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्तरावरील विविध चर्चासत्रात सक्रीय सहभाग. सहाय्यक प्राध्यापक म्हणून सुमारे दहा वर्षाचा अनुभव. 2015 मध्ये राजकीय सिद्धांत हे पुस्तक प्रकाशित तर अजून काही पुस्तकांचे काम प्रगतीपथावर आहे.