Summary of the Book
प्रांजळपणा हे 'मी पुष्पा कांबळे ' या आत्मकथनाचे सगळ्यांत महत्त्वाचे वैशिष्ट्य ठरले आहे .ते कुठेही अवसान आणताना किंवा अशा तऱ्हेच्या रूढ आत्मकथनांच्या चतुर रचनेत अडकताना दिसत नाही.हा प्रांजळपणा पराभूत मनोवृत्तीतून किंवा हतबलतेमधून आलेला नसून आयुष्याशी दोन हात करण्याच्या मनोवृत्तीतून आलेला आहे, हेही लक्षात घेतले पाहिजे .आणि म्हणूनच हे आत्मकथन समान प्रकारच्या व्यथा वेदनांना सामोरे जाणाऱ्या माता -भगिनींना सन्मानाने जगण्यासाठी नवे बळ देईल याविषयी 'ग्रंथाली 'ला खात्री आहे .