Hard Copy Price:
15% OFF R 300R 255
/ $
3.27
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
eBook Price:
20% OFFR 300R
240
/ $
3.08
Buy eBook
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
शांतरस व भक्तीरस यांनी ओथम्बलेलि कादंबरी वाचकांना उपलब्ध करून दिल्याबद्दल लेखक शरदचंद्र कोपर्डेकर यांचे मनःपूर्वक आभार. साधारणतः संतचरित्र म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती काही खलप्रवृत्तीची पात्रे व त्यांनी केलेला संतांचा छळ आणि तो संतानी कसा धीरोदात्तपणे सोसला याचं वर्णन शिवाय संतानी भक्तीच्या जोरावर केलेले चमत्कार. परंतु या कादंबरी मध्ये असे वर्णन टाळले आहे. संतश्रेष्ठ श्री कृष्णदयार्णव यांचा साधकावस्थेपासून पूर्णावस्थेपर्यंतचा प्रवास या कादंबरी मध्ये रेखाटला आहे व तो रेखाटताना कादंबरीच्या पूर्वार्धामध्ये कृष्णदयार्णव आपल्या आंतरिक जीवनाशी कसे झगडत होते व त्यांनी आपले विकार कसे जिंकले व त्या नंतर उत्तरार्धामध्ये ते पुर्णत्वाला कसे गेले व त्यांचे आंतरिक जीवन कसे उजळून निघाले याचे वर्णन करण्यात लेखक कमालीचे यशस्वी ठरले आहेत. संतांची गुरुभक्ती, त्यांनी भक्तीमार्गाचा केलेला प्रसार, धर्मजागरणाचं कार्य, भक्तांचा ऐहिकाच्या दलदलीतून केलेला उद्धार याचे सुरेख चित्रण प्रस्तुत कादंबरी मध्ये केलेले आहे.
थोडक्यात सांगायचे तर वाचकांना एका अपूर्व समाधानाची अनुभूती मिळवून देणारी एक उत्कृष्ठ कादंबरी असे वर्णन करावे लागेल.
Vikrant Desai
03 Dec 2015 10 40 PM
अत्यंत उत्कृष्ट असा आणि ज्ञान-भक्ती-कर्म अशा अध्यात्ममार्गातील सर्वांच्या संग्रही असावाच असा हा ग्रंथ आहे.संत श्रीकृष्णदयार्णव या एकनाथ महाराजांच्या शिष्यपरंपरेतील आणि आतापर्यंत अज्ञात असलेल्या,जगापुढे येऊ न शकलेल्या थोर अवतारी संताची ही कथा आहे. कृष्णदयार्णव यांची भगवद प्राप्तीसाठीची तळमळ आणि ओढ,त्यांचे संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज,संतश्रेष्ठ श्रीएकनाथ महाराज तसेच आद्य शंकरांवरील प्रेम आणि श्रद्धा व त्यांचे झालेले दर्शन,त्यांना लाभलेले महान सद्गुरु,या गुरुशिष्यांची उत्तर मानस यात्रा तसेच भारत भ्रमण,त्यांच्या पत्नी व त्यांचे कृष्णदयार्णवांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचे स्थान,दयार्णवांना झालेली भगवद्प्राप्ती आणि रक्ताच्या कर्करोगातून मुक्त होण्यासाठी एकनाथ महाराजांनी स्वप्नात येऊन दिलेली भागवताच्या दहाव्या स्कंधावरील टीका लिहिण्याची गुरु-आज्ञा,कृष्णदयार्णवांचे परमोच्च अनुभव आणि जीवन,त्यांनी घडवलेला त्यांच्या इतक्याच अधिकाराचा शिष्य,ज्ञान-भक्तीने भरभरून राहिलेले संवाद हे सर्व लेखकाने मनाचा ठाव घेणाऱ्या भाषेत कथन केले आहे.अशा या थोर संताला प्रकाशझोतात आणल्याबद्दल लेखक श्री शरदचंद्र कोपर्डेकरांचे शतशः आभार.