Summary of the Book
‘हजार-बाराशे लोकवस्ती असलेल्या गावातील, घरी अठराविश्व दारिद्रय असलेल्या मुलाची ‘साहेब’ होईपर्यंत दिलेल्या कडव्या झुंजीची ही कहाणी. जीवनाचा डाव अर्ध्यावर सोडून वडील परलोकवासी झालेले. आई संघर्षात राब-राब राबणारी अन् अशा परिस्थितीत जिद्दीनं उभं राहणाऱ्या मुलाची ‘रमू’ ते ‘साहेब’ अशी चित्रकथा.’
- श्री श्रीनिवास पाटील ( महामहीम राज्यपाल सिक्कीम )
‘परमेश्वरी इच्छेवर अवलंबून ण राहता जिद्द, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर निर्धारपूर्वक मात करून आपले संकल्प सिद्ध करणारी रमेश गोरख घोलप यांची स्फूर्तीदायक यशोकहाणी आगळी-वेगळी ठरते. संघर्षात ‘रडायचं नाही लढायचं !’ हा त्यांचा निर्धार पक्का होतो आणि हाच निर्धार ग्रामीण भागातून पुढे येण्यासाठी धडपडणाऱ्या असंख्य तरुण-तरुणींना दीपस्तंभासारखा मार्गदर्शक ठरावा इतका तो महत्वाचा आहे. पराकोटीची जिद्द आणि प्रखर आत्मविश्वास कुठल्याही अपयशाने खचून ण जाण्याची वृत्ती या आत्मकथनात ठायी-ठायी दिसून येते.
- डॉ. नरेंद्र जाधव ( ‘आमचा बाप अन् आम्ही’ या सुप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक )