Summary of the Book
अनुराधा पाटील आणि नीरजा या दोन कवयित्रींच्या कविताचा अभ्यास करून डॉ. समाधान इंगळे यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. काही कविता या आपल्याला अंतर्मुख करणाऱ्या असतात, त्याचबरोबर अनुभवसमृध्द करणाऱ्या असतात. अनुराधा पाटील आणि नीरजा यांच्या कविता वाचकाला निश्चितच आत्मसन्मुख आणि अनुभूतीनिष्ठ करतात. अभ्यासकांना संग्राह्य वाटेल असा हा समीक्षाग्रंथ आहे.
"व्यक्ती आणि अभिव्यक्ती' या प्रकरणापासून ते या दोन्ही कवयित्रीबरोबर साधलेला संवाद या प्रकरणापर्यंत एकूण सहा प्रकरणातून लेखकांने या दोन्ही कवयित्रींच्या काव्याचा अभ्यास केला आहे.