Hard Copy Price:
25% OFF R 100R 75
/ $
0.96
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
सीमा लढ्यात प्रदीर्घ काळ प्रत्यक्ष सहभाग असलेल्या कार्यकर्त्यांचे मनोगत सुभाष धुमे यांनी लोकलढा या पुस्तकात मांडले आहे.
आजपर्यंत अनेक पुस्तके वाचली. श्यामची आई वगळलं तर पुस्तक वाचताना डोळ्यातून कधी पाणी आलं नाही. कधीतरी भावनिक वगैरे व्हायला होतं, पण डोळ्यात पाणी नाही. आज लोकलढा वाचताना मात्र रहावलं गेलं नाही. सीमा प्रश्नासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी संपूर्ण कुटुंबासह प्रामाणिकपणे लढ्यात सगळं काही झोकून दिलं. नोकरी, उद्योग, पैसा, घरदार, सगळं वाऱ्यावर सोडून आंदोलनं, मोर्चे, घोषणा, निवेदने, उपोषण... पोलिसांचा अमानुष मार, अत्याचार, तुरुंगवास, कोर्टातील खटले... तरी सर्वांची शेवटची इच्छा एकच की, सीमाभाग महाराष्ट्रात असावा. त्यातील अनेक जण आज हयात देखील नाही. आज तिसरी-चौथी पिढी सीमा लढ्यात उतरली आहे. ६८ वर्ष उलटून गेली तरी प्रश्न जागचा हल्ला नाही. सगळं काही मनाला फार वेदना देऊन जातं. पाटसकर फॉर्म्युला किंवा जगभरात सीमेची फेररचना करताना वापरण्यात येणारे चार निकष लावले तरी अगदी न्याय्य पद्धतीने सीमाभाग महाराष्ट्रात टाकता येईल. सध्या प्रश्न सर्वोच्च न्यायालयात आहे, महाराष्ट्राची बाजू पूर्णपणे न्याय्य आहे. आज ना उद्या सीमाभाग नक्कीच महाराष्ट्रात असणार. पण तोपर्यंत गेली ६८ वर्षे सीमाभागातील मराठी भाषिकांचा जो विकास खुंटला आहे, त्याचं काय? हे महाराष्ट्र, कर्नाटक, केंद्र सरकारला, सर्वोच्च न्यायालयाला कळत नाही का ? याचं जास्त वाईट वाटतं.
पुस्तकात कार्यकर्त्यांच्या ज्या प्रतिक्रिया मांडल्या आहेत, तिथे सोबत मुलाखतीची तारीख दिली असती तर वाचताना त्या त्या काळातील राजकीय, सामाजिक वातावरणाचा अंदाज आला असता. पुढच्या आवृत्तीत त्या सुधारणा कराव्यात ही विनंती.