Summary of the Book
निरनिराळ्या पक्षात तरुण चेहरे दिसू लागले आहेत. हे तरुण विशेषत: चाळिशीच्या आतील नेते राजकारणाकडे कशा पद्धतीने पाहतात, त्यांचे विचार, कार्यपद्धती, योजना या सगळ्याचा ते कसा विचार करतात, राजकारणात त्यांना कोणते, कसे बदल अपेक्षित आहेत या सगळ्या गोष्टी या तरुण नेत्यांशी प्रत्यक्ष, फोनवर बोलून, काही वेळा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याबरोबर प्रवास करून मुलाखतीतून आष्टी भरतीया यांनी सविस्तर मांडल्या आहेत.
लेखिका : आष्टी भारतीया
अनुवाद : सुवर्णा बेडेकर
भारतीय लोकशाहीमध्ये अनेक पक्ष कार्यरत आहेत. वयाची सत्तरी ओलांडल्या नंतरही राजकारणात महत्त्वाच्या पदांवर ही नेतेमंडळी आपल्या जागा टिकवून आहेत; पण आता हे चित्र बदलत आहे.
निरनिराळ्या पक्षात तरुण चेहरे दिसू लागले आहेत. हे तरुण विशेषत: चाळिशीच्या आतील नेते राजकारणाकडे कशा पद्धतीने पाहतात, त्यांचे विचार, कार्यपद्धती, योजना या सगळ्याचा ते कसा विचार करतात, राजकारणात त्यांना कोणते, कसे बदल अपेक्षित आहेत या सगळ्या गोष्टी या तरुण नेत्यांशी प्रत्यक्ष, फोनवर बोलून, काही वेळा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन त्यांच्याबरोबर प्रवास करून मुलाखतीतून आष्टी भरतीया यांनी सविस्तर मांडल्या आहेत.
प्रत्यक्ष बोलून लिहिल्यामुळे ती नुसतीच माहिती न होता त्या लिखाणात एक सहजपणा दिसून येतो. यातील काहींना कौटुंबिक, राजकीय पार्श्र्वभूमी आहे तर काहींनी नोकरीतील महत्त्वाचे पद सोडून राजकारणात प्रवेश केला आहे आणि म्हणूनच प्रत्येकाचे खास वेगळेपण आहे.