Summary of the Book
दुःख हे मानवी जीवनाचा एक भाग आहे. दुःखानंतर आलेल्या सुखाचे महत्त्व जास्त असते. अशा या सुख-दुःखाच्या चक्रात कायम आनंदी राहणे, मन सतत उत्साही ठेवणे, ओठांवर कायम हास्य ठेवणे हे सहजसाध्य नसते. तणावरहित जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी अवतार मेहेरबाबा यांनी जगला प्रेमाचा संदेश दिला. त्याआधारे माणसे आपलीशी करण्यासाठी कसे बोलावे, इतरांशी व्यवहार कसा करावा, अडचणी कशा सोडवाव्यात, याचे मार्गदर्शन सदा खंडाळे यांनी ‘अमृतमय जीवन’मधून केले आहे. छोटे छोटे प्रसंग, गोष्टी सांगून जीवनात आनंद कसा मिळवावा, इतरांना कसा द्यावा, हे यात सांगितले आहे.