Summary of the Book
गेल्या अनेक शतकांपासून भारतामध्ये मुस्लिमांचे वास्तव्य आहे आणि हिंदू-मुस्लीम यांच्यामध्ये घनिष्ठ परस्परसंबंधही आहेत. असे असले तरीसुद्धा, बहुतांश हिंदू हे त्यांच्या इतिहासातील इस्लामी कालखंडाविषयी अस्वस्थ होतात. परिणामतः यापैकी बहुतांश हिंदूंना, इस्लामचे प्रचंड योगदान भारताच्या राष्ट्रीय अस्मितेच्या ऐतिहासिक बांधणीसमवेत जोडताना मोठी अडचण जाणवते. या अस्वस्थेमागील कारणे शोधण्याचा प्रयत्न करत असताना प्रस्तुत पुस्तक, सातत्याने हिंदूंच्या मनामध्ये मुस्लिमांविषयी असलेल्या या अढीचा संबंध भारतीय राष्ट्रवादी परंपरेत असलेल्या पूर्वग्रहाशी जोडता येईल, असा प्रतिवाद करते.
सुगम व उध्होदक शैलीत विषयाचा आवाका मांडणारे, महत्त्वाच्या परंतु अद्यापही पूर्णतः आकलन न झालेल्या हिंदू-मुस्लीम वादावरच्या साक्षेपी, संशोधनपूर्ण लेखनाचा हा लेखाजोखा इतिहासकार, समाजशास्त्र, राज्यशास्त्राचे तज्ञ अशा विस्तृत वाचकवर्गास आकर्षित करेल. तसेच वंशवाद, धर्म, सांप्रदायिक राजकारण आणि भारतीय राजकारणाची सद्यःस्थिती या विषयांतील समस्यांमध्ये औत्सुक्य असणाऱ्यांनाही हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल.
अमलेन्दू मिश्रा हे लॅन्केस्टर विद्यापीठ, यू. के.येथे राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान आणि धर्म विभागात ज्येष्ठ प्राध्यापक आहेत. तसेच लिस्बन विद्यापीठ, पोर्तुगाल येथे कला शाखेत संशोधन प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.