Summary of the Book
दोन हजार वर्षापूर्वी भारतात आलेले ज्यू ( इस्त्राएली ) येथील संस्कारात एकरूप होऊन गेले. सत्तर वर्षापूर्वी इस्त्राएलचे स्वतंत्र राष्ट्र स्थापन झाल्यावर पहिले पंतप्रधान स्व. डेवीड बेन गुरियोन यांनी सबंध जगात विखुरलेल्या ज्यू बांधवांना इस्त्राएल ह्या आपल्या राष्ट्रात येण्याचे आव्हान केले. सन १९५६ पासून भारतीय ज्यू समाज इस्त्राएल मध्ये जाऊ लागला. सन १९६७ च्या सहा दिवसाच्या लढाई नंतर इस्त्राएल राष्ट्राचे नाव जगात दुमदुमू लागले. आज २०१९ सालापर्यंत सबंध भारतातून ज्यू समाजाचे लोक इस्राएलमध्ये स्थलांतरित झाले आहेत. आता महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, रायगड जिल्हा व महाराष्ट्राबाहेर सुमारे चार ते साडे चार हजार इस्त्राएली समाजबांधव राहिले आहेत.
भारतात हजारो वर्षे हिंदू समजाबरोबर राहून, स्वतःचा धर्म सांभाळून ते गुण्यागोविंदाने राहात आहेत म्हणून ह्या पुस्तकात आम्ही इस्त्राएली समाजाचा भारत ते इस्त्राएल प्रवास व त्यांची जीवनपद्धती याची माहिती दिली आहे. लवकरच हे पुस्तक हिब्रु भाषेतही रुपांतरित होणार आहे.