आताच्या यांत्रिक युगात शिक्षणात विशेष प्राविण्य असणे, तसेच कौशल्यानुसार काम करण्याची तयारीही ठेवावी लागते, असे सांगत भौतिक सुविधांच्या वापरासाठी अर्थप्राप्तीशिवाय पर्याय नसतो. यासाठी मिळकत, बचत व खर्च यांचे गणित कसे जुळवावे, याबद्दल डॉ. डी. एस. काटे यांनी 'आर्थनीती मधून मार्गदर्शन केले आहे. पैसे अविचाराने खर्च केल्यास ओढवणाऱ्या स्थितीचे आकलन त्यांनी करून दिले आहे. भारतातील कारप्रणालीचा इतिहास सांगत सध्या अप्रत्यक्ष कराचा बोजा कसा वाढला आहे, हे स्पष्ट केले आहे. अर्थसाक्षरतेचे महत्व, औषध दरांची नफेखोरी , सोन्याचे राष्ट्रीयीकरण, अर्थविषमतेचे चटके, चलनाची चणचण, बँक, गैरव्यवहार, आभासी चलन आदी विषयांवर प्रकाश टाकला आहे. स्वदेशी वस्तूंचा वापर, युवकांच्या रोजगारसंधी व आव्हाने, भारतातील समस्या, दुभंगलेली अर्थव्यवस्था, बेगडी उत्सव संस्कृती, किसानदिन, अन्ननासाडी, प्रदूषण, कचरा, प्लॅस्टिक, पर्यावरण संतुलन आदी प्रश्नांवर यात चर्चा केली आहे. गांधीजींच्या स्वप्नातील अर्हतसमांत व अर्थसंकल्पीय लेखाजोखाही मांडला आहे.
‘अर्थनीती’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5368330891998272484