Summary of the Book
महर्षी विनोद रिसर्च फाऊंडेशनतर्फे व्यक्तित्व विकास शिबिरे डॉ. ऋजुता विनोद १९८४ पासून ते १९९४ पर्यंत प्रत्येक उन्हाळ्याच्या महाविद्यालयीन सुटीच्या काळात घेत असत. वय १५ पासून ते २५ पर्यंतची मुलेमुली जमत असत. एका महिन्याचे शिबिर ते असे. त्याकाळात अनेक महत्वाच्या विषयांवर गटचर्चा होत असत. प्रेम, प्रेमभंग, लग्न या विषयावर मोकळेपणाने बोलू शकणारी एक हक्काची जागा शांति-मंदिरे झाली होती. त्या गटचर्चेतील मुद्दे एकत्र करुन डॉ. ऋजुता विनोदांनी एक पुस्तक तयार केले. शिबिरातील एका विद्यार्थ्याने प्रसाद शिरगावकरने ते तरुणाई या त्याच्या संस्थेतर्फे प्रसिध्द केले. त्यानंतर ते अनमोल प्रकाशनने प्रसिध्द केले. हे पुस्तक कित्येक वर्षे out of print होते. नूतन यांनी कॅन्सरग्रस्त असताना या पुस्तकाचे स्कॅनिंग केले. त्यांच्या हयातीत ते प्रकाशित झाले नाही. बुकगंगातर्फे ते जुलै २०१२ मध्ये प्रकाशित करुन नूतन यांना श्रध्दांजली आम्ही वाहतो.