Summary of the Book
मनुष्याचं आयुष्य हे खर तर विलक्षण कोडं आहे! कारण त्याच्या आयुष्याच्या सुखदु:खाची चक्रं इतकी लयबद्ध असतात, कि ती मनुष्याला ज्ञात-अज्ञाताची केवळ पुसटशी ओळख करून देत असतात. त्या पुसटश्या ओळखीने तो अस्वस्थ होतो. त्यातून त्याच्या मनात असंख्य प्रश्न दाटतात. पण विश्वाच्या अफाट पसा-यात त्याला त्याची उत्तरं सापडणं कठीण असत. म्हणून तो विश्वनिर्मात्याच्या शोधात बाहेर पडतो. मनुष्याने अंधारात घेतलेली ही उडी नसते, ती असते सुरक्षित पायरी.तिथे उभं राहून तो निवांतपणे त्या विश्वनिर्मात्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार असतो. ते करतानाच तो स्वत:लाही शोधणार असतो. प्रस्तुत पुस्तकात त्याच दृष्टीने देवाशी संवादाचा प्रामाणिक, अर्थपूर्ण प्रयत्न केला गेला आहे.