Summary of the Book
समाजात अनेक चुकीच्या गोष्टी घडत असतात. त्याबद्धल सर्वसामान्य माणूस बोलू शकत नाही.
त्यात राजकीय क्षेत्र तर गैरव्यवहार, भ्रष्टाचार, लाचखोरी अशा गैरप्रकारांनी व्यापलेले आहे.
त्यावर व्यंगकथा रचून 'चुनाव रामायण' मधून ह. मो. मराठे यांनी चिमटे घेतले आहेत.
निवडणूक हा भारतीयांच्या दृष्टीने अपूर्व सोहळाच बनला आहे. या काळात घडणाऱ्या गोष्टींवर त्यांनी
कथांमधून भाष्य केले आहे. आंदोलन, मतदार, उमेदवार, तंटामुक्ती असे अनेक विषय घेऊन सध्याच्या
स्थितीवर त्यांनी टीका केली आहे.