Summary of the Book
शूर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी मेजर जनरल शुभी सूद यांनी त्यांच्या गाथा पुस्तकबद्ध केल्या आहेत. शौर्यगाथा या पुस्तकात त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील युद्ध, भारत-पाकिस्तान युद्ध, भारत-चीन युद्ध, कारगील युद्ध, शांतता काळातील पुरस्कार असे विभाग केले आहेत. सुभेदार किशनवीर नागरकोटी, खुदाद्खान आदींच्या पराक्रमाची माहिती मिळते. भारत-पाकिस्तान युद्धांत जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यापासून अब्दुल हमीद आदींच्या विरत्वाचे दर्शन झाले.
सर्वोच्च लष्करी सन्मानप्राप्त शूरांच्या परमवीर-गाथा रचना बिश्त-रावत यांनी दुसऱ्या पुस्तकात सांगितल्या आहेत. भारत-पाकिस्तान युद्धात पराक्रम गाजवलेले जदुनाथसिंग, करमसिंग, भारत-चीन युद्धातील धनसिंग थापा, जोगींदरसिंग आदींवर प्रकाश टाकला आहे. कारगील युद्धात पराक्रम गाजवलेले मनोजकुमार पांडे, संजय कुमार आदींचा समावेश आहे. दोन पुस्तकांच्या या संचाचा अनुवाद भगवान दातार यांनी केला आहे.