Gopal Dandgavale
21/03/2024
लिहिण्यास कारण की,
भारतीय दूरदर्शन क्षेत्रात इतिहास घडवणाऱ्या व लोकप्रियतेचा कळस गाठणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातील पोस्टमन काकांचे पत्रवाचन हा या कार्यक्रमाचा सर्वोच्चबिंदू होता. अरविंद जगताप यांनी लिहिलेल्या या पत्रांनी रडवले, हसवले, विचार करायला लावले. ही पत्र एवढी अद्वितीय आणि आशयपूर्ण होती की कायम आपल्यासोबत असावी असे वाटत होते. अशी ही सर्व पत्रं पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर आले आहे. मराठी पत्रलेखनातील आणि मराठी साहित्यातील हा अनमोल ठेवा आहे. वाचनप्रेमींसाठी ही साहित्यिक पर्वणी आहे.