Summary of the Book
हे आध्यात्मिक अनुभूती देणारे लेखन आहे. आनंद कामत यांनी आपल्याला आलेल्या अनुभूतीवर आधारित हे लेखन केले आहे. 'लेखनाचे उद्दिष्ट हे फक्त अध्यात्म खरोखरी कळावे आणि प्रत्येकाचा ओढा कुठेतरी योग्य ठिकाणी व्हावा, इतकेच आहे,' असे कामत यांनी मनोगतात नमूद केले आहे. शरीर अजिबात साथ देत नसतानाही त्यांनी गिरनारची ११ वी फेरी केली. ती स्वामी महाराजांच्या कृपेने असे ते सांगतात.
गिरनारच्या वारीची सुरुवात कशी झाली, साई उधीचा महिमा, व्याघ्र दृष्टांत असे क्रमाक्रमाने अनुभव वाचायला मिळतात. वाटेत संकटे आली, तरी महाराजांच्या कृपेने त्यांनी ती पार केली. याचे वर्णन पुस्तकात वाचायला मिळते. पादुकास्पर्शाचा अद्भूत अनुभव त्यांनी सांगितला आहे. प्रत्येकानेच गिरनार वारी अनुभवावी, असा संदेश ते देतात.